भय इथले संपत नाही..मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो..तू मला शिकविली गीते
या जगात, तु गेल्यावर मी भयभीत झालो आहे, आई तु मला जीवन जगण्यास शिकवलेस पण तरी मला तुझी आता खुप आठवण येते आहे
तु शिकवलेले सगळे मी व्यव्हारात आनतो आहे पन भयामुळे दिवस संपल्यावर.
ते झरे चंद्र सजणांचे, ती धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण, झाडांत पुन्हा उगवाया
ते झरे शितल चंद्रप्रमाणे आहेत, ती धरती एक रक्ताची माया देती आहे
तरी तुझ्या विचारांच्या झाडात तुझ्या रुपासहीत मी निजतो पुन्हा तुझ्याच आठवनीत उगवण्यास
त्या वेळी नाजूक भोळ्या, वारयाला हसवून पळती
क्षितीजांचे तोरण घेऊन, दारावर आली भरती
तुझ्या विचारात असताना त्या वेळा कधी निघुन जातात त्या कळत नाहीत
तरी तुला पहाताना(शोधताना) दुरवर क्षितीजांची तोरणे माझ्या मनाच्या दारावर दस्तक देती
तो बोल मंद हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू राघव शेला
तुझ्ये ते बोल माझे पुर्ण आयुष्य स्पर्शून गेले
माझ्या आयुश्याच्या वनवासात तेच माझे सोबती आहेत
जसे सीतेच्या वनवासातील राघव
देऊळ पलिकडे तरीही, तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबूळापाशी, मी उरला सुरला थेंब
देऊळ आहे येथे पलीकडे तरीही तुझ्या आठवणींचा फ़ुटका खांब माझ्यापाशी आहे आणि थरथरत्या डोळ्यात आता आठवणींशिवाय काहीच नाही हा आसवे म्हनशिल तर मीच त्यात एक उरला सुरला थेंब आहे
संध्येतील कमल फ़ुलासम, मी नटलो श्रृंगाराने
देहाच्या भवती रिंगण, घालती निळाईत राने
संध्याकाळी मी, तू सांगितल्या प्रमाणे नटतलेलो जगासंगे, सभोवताली आठवनींच्या क्षितीजासोबत निळाईत आकाशाची राने
स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख्ख कुणाचे
हे सरता संपत नाही, चांदणे तुझ्या स्मरणाचे
स्त्रोत्रात माझी इंद्रिये अवघी का गुनगुनती ही दुख्ख सारी
अग चांदण्या सम शितल स्मरणे तुझी सरता संपत नाहीत
ते धुके अवेळी होते, की परतायची घाई
मेंदुतून ढळली माझ्या, निष्पर्ण तरुंची राई
तू सांगीतल्या प्रमाणे मी जगतो संध्याकाळी अन रात्री
अन पहाटचे ते धुके अवेळी आले की मी भयभीत होउन लवकर परतलो कळतच नाही आणी डोक्यातून ढळते माझ्या निश्पर्ण तुझ्या शिकवलेल्या गितांची राई