Thursday, February 10, 2011

जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार

मी नथुराम गोडसे बोलतोय...
पण कोणी सुद्धा ऐकत नाही !
डोळे बंद, तोंड बंद...
बुद्धी ही चालवत नाही !

प्रत्येक जण इथे स्वतःच्या फ़ायद्यासाठी जगतोय,
वेगवेगळे रंग, आकार एकाच गोल चश्म्यातून बघतोय,
खोट्याची आरेरावी...
खऱ्याची भिक सुद्धा मागत नाही,
डोळे, कान, तोंड बंद...
बुद्धी ही चालवत नाही !

सत्याग्रह, त्याग अहिंसा... सगळ साफ झुठ आहे,
सत्य फक्त रक्ताची धार लागलेलं शिवबाचं बोट आहे...
जखम केव्हाच सुकली आहे,
पण रक्त मात्र थांबत नाही...
डोळे, कान, तोंड बंद...
बुद्धी ही चालवत नाही !

सज्जनांनी कधीच शस्त्र नव्हते त्यागले,
म्हणूनंच ना अटके पार, झेंडे आपले लागले ?
स्नान संध्ये साठी आता,
जल सिंधुचे संगत नाही...
डोळे, कान, तोंड बंद...
बुद्धी ही चालवत नाही !

संभवामी युगे युगे म्हणत्, कोणीच कसा आला नाही ?
खुदाने हिफ़ाजत केली नाही.. आणि विष्णु पुन्हा अवतरला नाही...
अस्त होणे अटळ आहे,
त्याशिवाय उदय होत् नही,
डोळे, कान, तोंड बंद...
बुद्धी ही चालवत नाही !

जे जे उत्तम उदात्त उन्नत, ते आम्ही स्मरणारच,
देशासाठी जन्मणार आणि देशासाठी मरणारंच,
महानतेला त्रिवार प्रणाम, पण.....
काळाची 'गरज' सरत नाही !
मी नथुराम गोडसे बोलतोय...
पण कोणी सुद्धा ऐकत नाही !
 
 
 जी हा........
जो धोका पत्करण्यास कचरतो, तो लढाई काय जिंकणार
 
 

No comments:

Post a Comment